Uday Samant : ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांवर उदय सामंत आणि Shambhuraj Desai काय म्हणाले

ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांवर उदय सामंत आणि शंभूराज देसाई काय म्हणाले, काल विरोधकांनी गायरान जमीन प्रकरण आणि सिल्लोड महोत्सव वसुलीप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली... आणि आज तीन मंत्री विरोधकांच्या निशाण्यावर होते... दुसरे मंत्री अन्न व औषध मंत्री संजय राठोड आहेत... गायरान जमीनीचं नियमबाह्य वाटप केल्याप्रकरणी विरोधकांनी संजय राठो़ड यांनाही घेरलंय... अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या दोघांवर गायरान जमिन प्रकरणी आरोप करण्यात आलेत.. आज अब्दुल सत्तार आरोपांवर  उत्तर देणार होते.. तिसरे मंत्री शंभूराज देसाई आहेत... महाबळेश्वरमधील नावली
येथे शेत जमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा आरोप शंभूराज देसाईंवर आहे...  चौथा नंबर उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आहे... उदय सामंत यांच्यावर दोनशे कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलाय.. त्यामुळे आता हे चार मंत्री त्यांच्य़ावरील आरोपांवर काय उत्तर देतात हे पाहावं लागेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola