Web Exclusive | महाराष्ट्राची चिंताजनक 'कोरोना' कहाणी; रुग्णसंख्या, मृत्यूच्या दरामध्ये महाराष्ट्र आघाडीवर
केरळ, पंजाब आणि महाराष्ट्र या तीन राज्यातील कोरोना रुग्णांची आणि मृत्यूची संख्या ही चिंताजनक पातळीवरती पोहोचली आहे. एबीपी माझाने 8 मार्च ते 15 मार्च या आठवड्याचे देशाचे विश्लेषण केले. त्यामध्ये महाराष्ट्रात अनेक बाबतीमध्ये आघाडीवर आहे हे दिसून येत आहे. देशाच्या तुलनेत केरळ आणि महाराष्ट्राची मिळून सात ते आठ टक्के लोकसंख्या होते. पण या दोनच राज्यांमध्ये मिळून देशाच्या 60 ते 70 टक्के रुग्ण आहेत.