Wardha Deoli Rains ; देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर परिस्थितीचा मोठा फटका
abp majha web team
Updated at:
13 Jul 2022 06:19 PM (IST)
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात गेल्या दहा वर्षात कधी नव्हे तेवढा पाऊस झाला असल्याचं नागरिक सांगत आहेत या पावसामुळे यशोदा नदीला पूर आला आणि जनजीवन तर विस्कळीत झालं आहेच मात्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या बळीराजाच्या देखील डोळ्यामध्ये अश्रू आणलेलं आहे..देवळी तालुक्यात सोनेगाव आबाजी परिसरात जून मध्ये काहीसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पूर्ण पेरण्या आटोपल्या होत्या.. मात्र यशोदा नदीला पूर आला आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या सर्व पेरण्या वाहून गेल्या आहेत...