Voter List Row: 'निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं', Raj Thackeray यांचा आयोगावर घणाघात
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दुबार मतदारांच्या (Duplicate Voters) प्रश्नावरून निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार टीका केली आहे. 'निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे', अशा शब्दात राज ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला. मतदार याद्यांतील घोळावर उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल, तर तुमचा काय उपयोग, असा सवालही त्यांनी विचारला आहे. दुसरीकडे, महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांनी राज ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. 'रिकाम्या भांड्याला आवाज जास्त असतो' असे म्हणत, विरोधी पक्षांकडे कार्यकर्ते नसल्याने ते केवळ आवाज करत असल्याचा टोला लगावला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यावर त्यात आक्षेप नोंदवता येतात, असेही सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement