Maharashtra Lockdown : कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेणार : मंत्री विजय वडेट्टीवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Apr 2021 05:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : कडक लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील. गरज पडली तर कालावधी वाढू शकेल, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊन आतापर्यंत 30 तारखेपर्यंत आहे. ती मुदत वाढवावी लागेल, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, लॉकडाऊन काळात लोकांना मदत करण्याबाबत आढावा घेतला. पुढच्या आठवड्यात सगळ्यांना मदत मिळाली पाहिजे. ते म्हणाले की, नाभिक समाजाला मदत कशी करायची यावर विचार सुरु आहे. माहिती गोळा करून कशी मदत करायची यावर चर्चा सुरु आहे. बांधकाम कामगार ,ऑटो रिक्षाचालकांच्या नोंदी आहेत.