Love Jihad Relationship Agreement : अॅग्रीमेंट रिलेशनशिप लव्ह जिहादचा नवा ट्रेंड? विहिंपचा आरोप
Continues below advertisement
विश्व हिंदू परिषदेचे (VHP) प्रवक्ते श्रीराज नायर यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'ममता बॅनर्जी यांचे सरकार हिंदूंना दुय्यम दर्जा देत आहे आणि मुस्लिम समुदायाचे तुष्टीकरण करत आहे', असे स्पष्ट मत नायर यांनी व्यक्त केले आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदू महिलांवरील अत्याचार आणि खासदार-आमदारांवर होणारे हल्ले कॅमेऱ्यात कैद होत असूनही सरकार कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, ममता सरकार मतांच्या राजकारणासाठी हिंदूंवर होणारे अत्याचार आणि नरसंहार याकडे दुर्लक्ष करत आहे, जे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे बंगालची जनता त्रस्त असून, आगामी विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही नायर यांनी दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement