Vegetable Price Hike | सततच्या पावसामुळे भाज्यांच्या किंमती कडाडल्या
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव
Updated at:
28 Sep 2020 09:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने पाऊस पडत असल्याने भाजी वर्गीय पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचा परिणाम म्हणून बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक कमी झाल्याने मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. भाज्यांच्या दराचा विचार केला तर किरकोळ बाजारात मेथी, पालक, कोथिंबीर या शंभर रुपयांच्या वर जाऊन पोहोचल्या आहेत तर गवार, टोमॅटो 80, शेवगा 100, गिळके दोडके गिलके 70, पट्टाकोबी 60, भेंडी 40, बटाटे 40 रुपये प्रतिकिलो दराने किरकोळ बाजारात विकले जात आहेत. वाढलेल्या या भाज्यांचे दर नोकरदार वर्गाला परवडणारे असले तरी सर्वसामान्य माणसाला मात्र परवडणारे नसल्याने त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.