Hingoli : Varsha Gaikwad यांचा फटाके फोडून पूरग्रस्त पाहणी दौरा; सर्व स्तारांतून संपात ABP Majha
माधव दिपके
Updated at:
16 Sep 2021 03:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत दौऱ्यादरम्यान ते आज सकाळी वसमत तालुक्यातील आरळ शिवारामध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असताना फटाके फोडत वर्षा गायकवाड यांचे स्वागत करण्यात आले. अगोदरच जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली आली आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये फटाके फोडून आतिषबाजी करण्याची गरज तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाभरातील शेतकरी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा करत असताना अशा पद्धतीने पालकमंत्री वर्षा गायकवाड यांचे फटाके फोडून स्वागत करणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा नव्हे का? शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणे फक्त फोटो पुरतेच का? असे एक ना अनेक प्रश्न या प्रसंगी निर्माण झाले आहेत.