Maharashtra Rains: मराठवाड्यात 'अवकाळी'चा कहर, Soybean, Cotton आणि Maize पिकांचे मोठे नुकसान
Continues below advertisement
राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून मराठवाडा (Marathwada), विदर्भ (Vidarbha) आणि उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे सोयाबीन (Soybean), मका (Maize) आणि कापसासह (Cotton) इतर शेतीपिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जालना (Jalna), लातूर (Latur), परभणी (Parbhani) आणि बीड (Beed) या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी कापणी करून शेतात ठेवलेले सोयाबीन आणि मका पावसामुळे भिजले असून, वेचणीला आलेल्या कापसाचेही मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement