Unseasonal Rain | राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा कहर, पिकांचं नुकसान
वाशीम जिल्ह्यात दोन दिवसांअगोदर झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यात वाशीम तालुक्यात 1693 हेक्टर, रिसोड तालुक्यात 1473, हेक्टर, मालेगाव तालुक्यात 1132, मानोरा तालुक्यात 531 हेक्टर तर मंगरूळपीर तालुक्यात 50 हेक्टरवर कांदा, भाजीपाला, कडधान्य, फळ बाग, गहू, हरभरा या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर आकडा समोर येणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होतं आहे.