Ulhas Bapat on CJI Chandrachud : सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावलं असेल तर ती चूकच!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUlhas Bapat on CJI Chandrachud : सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावलं असेल तर ती चूकच!
सरन्यायाधीशांनी पंतप्रधान यांना बोलावलं असेल तर ही चूकच, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांचे मत देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती केल्यानंतर आता अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधानांनी गणेशाची आरती केल्याची ही पहिलीच घटना आहे. या विषयावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान आणि सरन्यायाधीश दोन्ही घटनेचे पद आहेत. घटनेच्या अनेक तत्वांना आता तिलांजली दिली जातेय. घटनेत सगळ्याच गोष्टी लिहल्या नसतात, घटना उत्क्रांत होत गेलेली असते. प्रसिध्दी पासून न्यायाधीशांनी दूर राहावं असं म्हणलं आहे पण याकडे दुर्लक्ष झालं आहे असं बापट म्हणाले.