Shivsena Samaana Editorial : मोदींची नऊ वर्ष देशाच्या नाकी नऊ आलेला कालखंड, सामनातून टीकास्त्र
मोदी सरकारने ९ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय.. त्यावरून सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आलाय.. पंतप्रधान मोदी यांची नऊ वर्षे म्हणजे देशाच्या, जनतेच्या नाकी नऊ आलेला कालखंड आहे. तो लवकर संपेल तेवढे बरे अशी टीका करण्यात आलीये.. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, काळा पैसा वाढला, रोजगार देण्याचे वचन फसले. या सगळय़ा गोष्टींमुळे जगात भारताची मान उंच झाली असे मोदींच्या अंध भक्तांना वाटणे स्वाभाविक आहे.. कारण त्यांच्या दृष्टीने 'मोदी हाच भारत व भारत म्हणजेच मोदी आहे असा टोला सामनातून लगावण्यात आलाय..