Uddhav Thackeray PC : मतदानादिनी उद्धव ठाकरे कडाडले, निवडणूक आयोगावर भडकले ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई: ठाकरे गटाला ज्या ठिकाणी मतदान जास्त पडतंय त्या ठिकाणी केंद्रावर जाणूनबूजून विलंब केला जातोय, मतदारांना मुद्दामून ताटकळत ठेवल्याचं दिसतंय असा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. कितीही वेळ लागला तरी मतदारांनी मतदान करावं असं आवाहनही त्यांनी केलं. उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी मतदारांना हे आवाहन केलं.
अधिकाऱ्यांकडून जाणूनबूजून वेळकाढूपणा सुरू
मतदारांमध्ये उत्साह मोठा असून निवडणूक आयोगाकडून मतदान करण्याचं आवाहन केलं जातंय. मात्र अशातच निडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत असून पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातोय. मतदारांनी मतदानाला उतरवू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला मतदानाला जाणून बूजून वेळ केला जातोय, त्यावेळी तुम्ही जवळच्या शिवसेना शाखेला त्याची माहिती द्या.