Satyacha Morcha Speech : मतदार याद्यांमधील घोळावरून घमासान, ठाकरे बंधूंचा हल्लाबोल
Continues below advertisement
मुंबईत आज विरोधकांनी दुबार मतदारांच्या (Duplicate Voters) मुद्द्यावरून 'सत्याचा मोर्चा' काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या मोर्चात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच मंचावर दिसले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना अत्यंत आक्रमक आवाहन केले; '...तिकडे हे दुबार तिबार वाले आले, तिथेच फोडून काढायचे! बडव-बडव-बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे'. कल्याण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी येथील साडेचार हजार मतदार मलबार हिलमध्येही मतदान करत असल्याचा पुरावा त्यांनी सादर केला. मुख्यमंत्र्यांनी मतचोरी मान्य केली आहे, असा दावा करत त्यांनी 'दूध का दूध, पाणी का पाणी' करण्याचे आव्हान दिले. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा नोकर असल्याचा आरोप करत, त्यांनी आपला पक्ष, चिन्ह आणि वडील चोरल्यानंतर आता मतचोरीचा प्रयत्न होत असल्याची टीका केली. सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत तपासून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement