Uddhav Thackeray Satyacha Morcha Speech फडणवीसांना चॅलेंज, राज ठाकरेंनीही ऐकलं उद्धव ठाकरेंचं भाषण

Continues below advertisement
मुंबईत झालेल्या विरोधी पक्षांच्या 'सत्याचा मोर्चा' सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मतदार यादीतील घोटाळ्यावरून (Voter List Scam) सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. 'ह्या आनाकोंड्याला आता आपल्याला कोंडावंच लागेल कारण यांची भूक शमत नाही', असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. माझ्या नावाने 'सक्षम ॲप'वर (Saksham App) खोटा अर्ज करून मला आणि माझ्या कुटुंबाला मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप ठाकरेंनी केला. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी हा अर्ज करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोग (Election Commission) सत्ताधाऱ्यांचे नोकर असल्यासारखे वागत असून लोकशाही धोक्यात आली आहे, असेही ते म्हणाले. मतदारांनी जागरूक राहावे आणि मतदार याद्या तपासाव्यात, असे आवाहन करत, प्रसंगी मतचोरांना लोकशाहीच्या मार्गाने फटकावण्याचे संकेतही त्यांनी दिले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola