Uday Samant : रत्नागिरीची जागा आम्ही भाजपसाठी सोडली ; आता ठाण्याची मिळावी - उदय सामंत

Continues below advertisement

Uday Samant : रत्नागिरीची जागा आम्ही भाजपसाठी सोडली ; आता ठाण्याची मिळावी - उदय सामंत बातमी महायुतीच्या गोटातून...नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालाय. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी -सिंधुदुर्गची जागा भाजपसाठी सोडण्यात आलीय. किरण सामंत या जागेसाठी इच्छुक होते मात्र या जागेवर भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी देण्यात आलीय. जशी ठाण्याची भाजपची पारंपरिक जागा आहे असं बोललं जात तशीच रत्नागिरी- सिंधुदुर्ग ही आमची पारंपरिक जागा आहे पण ती आम्ही भाजपसाठी सोडलीय त्यामुळे ठाण्याची जागा आम्हालाच मिळावी  असा आमचा आग्रह असल्याच उदय सामंत यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे भुजबळांनी माघार घेतल्यानंतर नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल अशा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केलाय. एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलतांना सामंतांनी या दोन जागांसंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram