Konkan : गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, मुंबईहून सुटलेल्या गाड्या अजूनही रत्नागिरीपर्यंतच
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
09 Sep 2021 11:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणपतीच्या एक दिवस अगोदर मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात येत आहेत. मागील चार दिवसांची तुलना करता ही संख्या नक्कीच मोठी आहे. हजारो खासगी गाड्या आणि जवळपास 75 विशेष गाड्या या कोकण रेल्वे मार्गावरती धावत आहेत. त्यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात लाखो भाविक, चाकरमानी येत आहेत. रेल्वे प्रत्येक स्थानकावर अर्धा तास थांबत असल्याने अनेक गाड्या आतापर्यंत रत्नागिरीपर्यंतच पोहोचल्या आहेत.