Maratha Reservation : मराठा समाजाचा उद्याचा मोर्चा रद्द, लॉकडाऊन वाढवल्याने निर्णय : विनायक मेटे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 May 2021 09:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकार आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र हे करंटे, पांढऱ्या पायाचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. राज्य सरकारने कोर्टात योग्यरित्या बाजू मांडली नाही. विरोधी पक्षांना सोबत घेतलं नाही, वकिलांना मार्गदर्शन केलं नाही. गायकवाड समितीमधील महत्वाचे पुरावे जोडले नाही, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.