Tomato Hike in Mumbai : आवक घटल्यानं मुंबईत टॉमॅटो महागणार, प्रति किलोचा दर 60 रुपये

सततच्या पावसामुळे आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर महागले आहेत. त्यात 3-4 दिवसांआधी 30 ते 40 रुपये प्रति किलो असलेले टोमॅटोचे दर आज किरकोळ बाजारात 60 रुपये प्रति किलो रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पावसामुळे टोमॅटोची आवक घटल्यानं भाववाढ झालीय. उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत असतो. मात्र पावसामुळे त्याची आवक कमी झाली आहे. पुढील 3-4 दिवस पावसाचा जोर पाहता हा दर चढाच राहील अशी शक्यता आहे. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola