Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस : ABP Majha
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला ९ फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण झाले. मात्र अद्याप सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने कालपासून पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी आमरण उपोषण सुरू केलंय.. जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील जरांगेंनी दिलाय..