Onion Farmer Maharashtra : कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदीच निर्णय

राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजावर उपासमारीची वेळ आलीय. सगळीकडे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हा अवकाळीनं हिरावलाय. तर तिकडे नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर अनेक शेतकरी नुकसानीतून सावरत असतांना सततच्या पडणा-या धुक्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या धुक्यामुळे कांद्यावर ' करपा ' रोगाचा प्रादुर्भाव वाढून कांद्याची पात पिवळी पडू लागलीय. त्यामुळे कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागतेय...तसंच धुक्याचं प्रमाण दिवसभर राहत असल्यानं रोग नियंत्रणात येत नसल्याने पिकांचं आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola