Thane Politics: '८०-८५ नगरसेवक आमच्याकडे, युती झाली नाही तर…', Naresh Mhaske यांचा भाजपला इशारा

Continues below advertisement
ठाण्यामध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) नरेश म्हस्के आणि भाजपचे संजय केळकर यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. नरेश म्हस्के यांनी ठामपणे सांगितले की, 'आमची युतीत लढण्याची तयारी आहे, पण जर युती झाली नाही तर आम्हाला लढावं लागणार आहे ना, कारण ८० ते ८५ नगरसेवक आमच्याकडे आहेत'. दुसरीकडे, भाजप आमदार संजय केळकर यांनीही पक्ष स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, गेल्या अनेक वर्षांपासून युती झाली नसतानाही त्यांचा पक्ष निवडणुकीसाठी कायम तयार असतो. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे ठाण्यातील महायुतीमध्ये जागेवाटपावरून मतभेद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola