Mahapalikecha Mahasangram Thane : ठाण्यातील व्यापारी त्रस्त, आश्वासनं कधी पूर्ण होणार?
Continues below advertisement
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या (Thane Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर, शहरात राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी अनेक समस्यांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आश्वासनच मिळत असतात, ती आश्वासनं कधी पूर्ण होतील?' असा सवाल स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे. २०१६ मध्ये रस्ता रुंदीकरणासाठी जागा देऊनही वाहतूक कोंडी (Traffic Congestion) आणि फेरीवाल्यांचा (Hawkers) त्रास कमी झाला नसल्याची तक्रार आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे, अपुऱ्या नागरी सुविधा आणि प्रशासकीय राजवटीतील कामकाजावरही नागरिकांनी बोट ठेवले आहे. आगामी निवडणुकीत जुनी आश्वासने पूर्ण करणाऱ्यांनाच मतदान करण्याचा निर्धार ठाणेकर व्यक्त करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement