Thackeray Reunion: तब्बल २० वर्षांनी दुरावा संपला? भाऊबीजेनिमित्त Uddhav Thackeray बहिणीच्या घरी, Raj Thackeray ही उपस्थित!

Continues below advertisement
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय मनोमिलनाकडे पाहिले जात आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे तब्बल दोन दशकांनंतर त्यांची बहीण जयजयवंती देशपांडे यांच्या घरी पोहोचले, जिथे राज ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. 'दोन हजार चार नंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बहीण जयजयवंती देशपांडे यांच्या घराचा उंबरठा चढलेले पाहायला मिळाले' ही माहिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये जयजयवंती यांचे सुपुत्र यश देशपांडे यांच्या विवाहसोहळ्यातही दोन्ही भाऊ एकत्र आले होते, तेव्हापासूनच त्यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना सुरुवात झाली होती. आजच्या भेटीमुळे या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून भविष्यात ठाकरे बंधू राजकारणात एकत्र येणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola