Supreme Court on Marathwada water issue : उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडलं जाणार
मराठवाडा पाणीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिलाय... उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून आता जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा कारखाना, संजीवनी कारखाना आणि शंकरराव काळे कारखाना या तिघांनी न्यायालयात याचिका दाखल करत जायकवाडीला पाणी देण्याच्या विरोधात भूमिका घेतली होती. या सर्व याचिकेवर एकत्रित सुनावणी आज पार पडली...