Raigad Politics: 'वेळ येईल तेव्हा हिशेब चुकता करू', Sunil Tatkare यांचा Shiv Sena ला थेट इशारा

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांना दिलेल्या इशाऱ्याने रायगडमधील (Raigad) राजकीय वातावरण तापले आहे. 'वेळ येईल तेव्हा त्यांचा हिशेब नक्कीच चुकता करू', असा थेट इशारा तटकरे यांनी खालापूरमधील एका कार्यक्रमात दिला आहे. रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर (Political Equations) कोणी काहीही टीका करत असले तरी शांत राहा, आपण हतबल नाही, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. वेळ आल्यावर राजकीय प्रतिकार करण्यासाठी दुप्पट वेगाने बाहेर पडू, असेही ते म्हणाले. तटकरेंच्या या वक्तव्यामुळे महायुतीमधील (Mahayuti Alliance) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola