Jan Ashirwad Yatra : जनआशीर्वाद यात्रा ... सुरुवात ते शेवट! वादग्रस्त वक्तव्य, अटक, आरोप-प्रत्यारोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकनाट्यानंतर थांबलेली जनआशीर्वाद यात्रा आज कोकणात पुन्हा सुरू करणार आहेत. राणे रत्नागिरीतून यात्रेला सुरुवात करून नंतर संध्याकाळनंतर त्यांच्या होमपीचवर म्हणजे सिंधुदुर्गात जाणार आहेत. सिंधुदुर्गात जमावबंदी लागू करण्यात आल्यानं राणेंच्या यात्रेत पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यातच राणेंनी शिवसेनेवर टीका सुरूच ठेवली तर जनआशीर्वाद यात्रेला विरोध करू असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिल्यानं कोकणात राणे आणि शिवसेना पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola