ST Workers Strike : पगारवाढीनंतर एसटीचे 10 हजार कर्मचारी कामावर परतले, राज्य सरकारचा दावा ABP Majha

Continues below advertisement

एसटी कर्मचाऱ्यांना ४१ टक्के वेतनवाढ जाहीर झाल्यानंतर १० हजार कामगार कामावर परतल्याचा दावा राज्य सरकारने केलाय. कर्मचारी कामावर परतले नाही तर कठोर कारवाईचा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला होता. त्यानंतर कर्मचारी हळूहळू कामावर रुजू होत असल्याचा दावा करण्यात आलाय. सांगलीत सर्व दहा आगारांसह राज्याील २४ आगारांमधील वाहतूक हळूहळू सुरु झाल्याचा दावाही सरकारने केलाय. काल रात्री ८ वाजताच्या आकडेवारीनुसार विविध मार्गांवर ४५७ बसेसद्वारे ११ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram