Special Report | वासना, क्रोध आणि सूड; पाच जणांची हत्या, मारेकऱ्याची आत्महत्या
नागपूरच्या पाचपावली परिसरातील बागल आखाडा जवळ एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आहे. धक्कादायक म्हणजे त्याच कुटुंबातील आलोक मातूरकर नावाच्या 40 वर्षीय आरोपीने या सर्व हत्या केल्या असून हत्याकांडानंतर त्याने स्वतः गळफास लावून आत्महत्या केली आहे. पत्नी, मुलगी, मुलगा, मेहुणी आणि सासू यांची हत्या आरोपीने केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.