Special Report | कावळयांची भूक भागवणारे रहिमभाई... 15 वर्षांपासून कावळ्यांशी निखळ मैत्री

यवतमाळ : यवतमाळ-अमरावती मार्गावरून जाताना एका ट्रकच्या मागे घिरट्या घालत पक्षी एका व्यक्तीच्या येण्याची आतुरतेने रोज पहाटे वाट पाहत असतात. कारण त्यांचा दोस्त मागील 15 वर्षांपासून त्यांच्यासाठी घरून न चुकता रोज काहीतरी हक्काने घेऊन येणार हे पक्षांनाही माहितीय. रहिमभाई असं त्या पक्षीमित्राचं नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेरच्या मालखेड गावाजवळ हा प्रसंग घडतो.
मागील 20 वर्षांपासून ट्रान्सपोर्ट व्यवसायात असलेले मिर्झा रहिमबेग यांची गाडी एकेदिवशी मालखेड गावााजवळ बंद पडली. त्यामुळे ते गाडी दुरुस्त होईपर्यंत गाडीजवळ थांबले होते. त्यांना भूक लागल्याने त्यांनी जवळचे बिस्किट खाण्यास सुरुवात केली. त्याचवेळी भुकेने व्याकुळ झालेला एक कावळा त्यांच्याकडे आला. त्याला रहीमभाई यांनी जवळचे एक बिस्कीट दिले. त्यानंतर तो कावळा पुन्हा दुसरे बिस्किट मिळेल या आशेने पाहु लागला पुन्हा राहिमभाई यांनी बिस्किट दिले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा कावळा त्याच ठिकाणी आला आणि पुन्हा रहिमभाई यांनी त्याला बिस्किट दिले. तिसऱ्या दिवशी कावळा आपल्यासोबत आणखी काही कावळे घेऊन आला. त्यावेळी राहिमभाई यांनी घरची खिचडी आणि काही बिस्किटं त्यांना दिली. मग दिवसागणिक कावळ्यांची संख्या वाढत गेली आणि आज असंख्य कावळे राहिमभाई यांच्या येण्याची अशीच आतुरतेने आस लावून असतात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola