FYJC Admission : अकरावीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना विशेष संधी, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन तीन फेरी पूर्ण होऊन सुद्धा अजूनही मुंबई विभागात साधारपणे 70 हजार विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले नसून अजूनही कॉलेजच्या प्रतीक्षेत आहेत. पसंतीच्या कॉलेजसाठी धरलेला आग्रह, तांत्रिक अडचणी अशा कारणांमुळे विद्यार्थी अजूनही कॉलेज मिळावं यासाठी विशेष फेरीची वाट पाहताय. जेणेकरून आपल्या पसंतीचा कॉलेज या फेरीत तरी मिळेल. मात्र, खरंच नामांकित कॉलेजला या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीनंतर प्रवेश मिळणार का? हा प्रश्न उद्भवला असतांना अकरावीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना विशेष संधी मिळणार आहे.उद्यापासून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य मिळणार आहे.
Tags :
FYJC