नाट्यगृहबंद,कलाकार,नाट्यनिर्मात्यांचं नुकसान;या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्यांनी जगायचं कसं?ABP Majha
पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह ११ जिल्ह्यांमध्ये कोरोना स्थिती नियंत्रणात नसल्यानं तिसऱ्या गटातील निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यात सिनेमागृह, नाट्यगृह बंद असल्यानं कला क्षेत्रातील व्यावसायिकांना, कलाकारांना अजूनही झळ बसतेय. ज्यांचा संसार नाटकावर अवलंबून आहे, अशांनी करायचं काय? असा सवाल कलाकार विचारताहेत. नाटक, जत्रा न झाल्यानं लावणी कलाकार, मेकअप आर्टिस्ट अशांचं जगणं कठीण झालं. त्यांचं म्हणणं जाणून घेतलंय आमचा प्रतिनिधी आफताब शेख याने