भारतात कोरोनाच्या संसर्गाला मोदी जबाबदार,त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा : प्रकाश आंबेडकर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणून कार्यक्रम केला, त्यामुळे भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.