Solapur: ओढ्याच्या पाण्यात बुडून मुलांचा मृत्यू ABP Majha
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील आष्टीमध्ये ऊसतोड कामगारांच्या तीन अल्पवयीन मुलांचा ओढ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झालाय.... सुरेखा गायकवाड, रेणूका जाधव आणि अजय जाधव अशी या तीन अल्पवयीन मुलांची नावं आहेत.... ही मुलं परभणीच्या शिंगणापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. त्याचं सर्व कुटुंब ऊस तोडणीच्या कामासाठी आष्टीमध्ये आलं होतं. आई-वडील ऊस तोडणीचं काम करत असताना ही मुलं जवळच्या ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेली.. त्यावेळी या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला....