Solapur : दिल्लीवरून महाराष्ट्र सरकारला रोज त्रास दिला जातो,Sharad Pawar यांचा केंद्र सरकारवर घणाघात
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भाषण करताना पवार यांनी भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीवरुन रोज महाराष्ट्र सरकारला त्रास दिला जात असल्याच देखील त्यांनी या भाषण म्हटलं आहे. सोलापूरच्या आगामी महापालिका निवडणुकांची रणनीती आखण्याकरीता शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर असल्याचं बोललं जातंय.