Shahpur Water Crisis : धरण उशाशी कोरड घशाशी,पाण्यासाठी भटकंती; शहापूर,कसाराकरांचं भीषण वास्तव
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShahpur Water Crisis : धरण उशाशी कोरड घशाशी,पाण्यासाठी भटकंती; शहापूर,कसाराकरांचं भीषण वास्तव धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर व कसारा भागातील जनतेचं घसा मात्र अजूनही कोरडाच आहे .मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यात भातसा ,तानसा,वैतरणा, मोडकसागर सारख्या महाकाय जलाशयांची जलसंपत्तींचा ठेवा उशाशी असतानाही येथील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील शहापूर ,कसारा माळ,विहिगाव,ढेंगणमाळ,सुसरवाडी, वशाळा ,साठगाव, सावरदेव पाडा, चिंध्याचीवाडी, कोथळा,आपटे गावासह जवळपास 250 गाव पाड्यावर भिषण पाणी टंचाई असून 192 गाव पाड्यावर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या परिसरात विहिरी कोरड्या ठाक पडलेल्या आहेत काही विहिरीत दगडाच्या फटीतून थेंब थेंब पाणी विहिरीत जमा होतो आणि एक हंडा पाणी साचायला जवळपास एक ते दोन तास लागतात विहिरीतील पाणी खोलगट भागात असल्याने जीव धोक्यात घालून फक्त एक हंडा पाण्याकरता महिला व पुरुष विहिरीमध्ये उतरतात तसेच विहिरीच्या कठड्यावर उभे राहून दोरीच्या मदतीने पाणी खेचून पाणी भरलं जातं त्यामुळे जीवाचा धोका कायम असतो.