Sanjay Raut On Bacchu Kadu : बच्चू कडूंना अर्बन नक्षल ठरवण्याचा प्रयत्न : संजय राऊत
Continues below advertisement
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'मी बावनकुळे यांच्या ५२ कुळ्यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं दोन दिवसांत बाहेर काढतोय,' असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये 'चक्का जाम' आंदोलन सुरू असून, त्यामुळे नागपूर-हैदराबाद आणि जबलपूरसह अनेक महामार्ग रोखण्यात आले आहेत. 'सात बारा कोरा करा' ही मूळ मागणी उद्धव ठाकरेंचीच होती, असेही राऊत म्हणाले. तसेच, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाप्रमाणेच बच्चू कडूंच्या आंदोलनाला माओवाद्यांचा पैसा मिळत असल्याचा आरोप करून त्यांना 'अर्बन नक्षल' ठरवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement