Sanjay Raut : राज्यात कायदा सुव्यवस्थेबद्दल चिंतेचा विषय असताना, गृहमंत्री कुठे आहेत?
मुंबई: उद्या एखादा कुत्रा गाडीखाली आला तरी विरोधी पक्ष गृहमंत्र्यांचा राजीनामा मागेल, असे वक्तव्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊतांनी (Sanjay Raut) टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हल्ल्यात मरणारी लोकं कुत्र्याची पिल्लं वाटतात का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.