महाराष्ट्र बंद जर राज्य सरकार पुरस्कृत होता,तर लखीमपूरची घटना योगी सरकार पुरस्कृत आहे का?Sanjay Raut

आजचा महाराष्ट्र बंद जर राज्य सरकार पुरस्कृत होता, तर लखीमपूरची घटना योगी सरकार पुरस्कृत आहे का?, असा सवाल संजय राऊतांनी भाजपला विचारलाय... भाजपकडून आजचा बंद हा राज्य सरकार पुरस्कृत आहे... अशी टीका करण्यात आली होती... यावर प्रतिक्रिया देत संजय राऊतांनी टीका केलीय... तर मोदी सरकार एखाद्या मूकबधिरासारखं काम करतंय, यूपीत आरोपींना पाठीशी घातलं जातंय याचाच विरोध आज महाराष्ट्रानं केला.... असंही संजय राऊतांनी म्हटलंय... तर बंदमध्ये कधी कधी असं होतं असं म्हणत शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीचं कुठे तरी संजय राऊतांनी समर्थन केलं...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola