Sanjay Raut PC | छत्रपतींच्या वारसदारांनी भाजपतून राजीनामे द्यावेत : संजय राऊत | ABP Majha
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरुन भाजपवर चौफेर टीका होत असताना. या पुस्तकावर हल्लाबोल करणाऱ्या कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे आणि शिवसेना खासदार संजय राऊत याच्यामध्येच वाग्युद्ध रंगलंय. भाजपमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी राजीनामे द्यावे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेचं या पुस्ताकाविरोधात महाराष्ट्रातील जनता बोलतं आहे. त्यामुळे छत्रपतींच्या गादीच्या वारसदारांनी या विषयावर बोललंच पाहिजे असं मतं संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.