Jayant Patil Taunts BJP | झाडाचे पान का पडले, म्हणूनही भाजप आंदोलन करु शकते : जयंत पाटील
सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तसंच झाडाचे पान का पडले म्हणूनही भाजपा आंदोलन करु शकते, असा टोलाही जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरुन भाजपाला लगावला आहे. वाळवा तालुक्यातल्या कुरळप इथे पी आर पाटील यांच्या अमृत महोत्सव सत्कार कार्यक्रमानंतर जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते.