Sandeep Deshpande On Mukesh Ambani : रिलायन्स ही गुजराती कंपनी तर महाराष्ट्रात आलातच का? : देशपांडे
abp majha web team
Updated at:
11 Jan 2024 12:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSandeep Deshpande On Mukesh Ambani : रिलायन्स ही गुजराती कंपनी तर महाराष्ट्रात आलातच का? : देशपांडे
व्हायब्रंट गुजरात या ग्लोबल समिटमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एका वक्तव्यावर मनसेने आक्षेप घेतलाय. रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम गुजराती कंपनीच राहणार, असे वक्तव्य रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये केले. देशभर विस्तारलेल्या रिलायन्स उद्योगसमूहाची पाळेमुळे महाराष्ट्रात रुजली आहेत. अंबानी कुटुंबीयही मुंबईतच राहून आपला उद्योगधंदा सांभाळत आणि वाढवत आहेत. त्यामुळेच त्यांची गुजरातबाबतची वक्तव्ये चर्चेत आली आहेत. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
व्हायब्रंट गुजरात या ग्लोबल समिटमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एका वक्तव्यावर मनसेने आक्षेप घेतलाय. रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम गुजराती कंपनीच राहणार, असे वक्तव्य रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये केले. देशभर विस्तारलेल्या रिलायन्स उद्योगसमूहाची पाळेमुळे महाराष्ट्रात रुजली आहेत. अंबानी कुटुंबीयही मुंबईतच राहून आपला उद्योगधंदा सांभाळत आणि वाढवत आहेत. त्यामुळेच त्यांची गुजरातबाबतची वक्तव्ये चर्चेत आली आहेत. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.