Shinde vs Thackeray : उद्धव ठाकरेंचा संघावर हल्लाबोल, एकनाथ शिंदेकडून जोरदार प्रत्यूत्तर
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी संघाच्या शंभर वर्षांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी मोहन भागवत यांना उद्देशून विचारले की, “शंभर वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की, भागवत साहेब, ज्या कामासाठी शंभर वर्षे संघाने मेहनत केली अन् त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का?” असा सवाल त्यांनी केला. संघाच्या मेहनतीला विषारी फळे लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावर शिंदे यांनी संघाची बाजू मांडली. संघाकडून शंभर वर्षे समर्पित भावनेने देशाची सेवा करण्यात आल्याचे शिंदे यांनी म्हटले. तसेच, राष्ट्रभक्त, देशभक्त आणि शस्वत देखील टीका करणाऱ्यांना त्यांनी हिंदुत्ववादी नसल्याचे म्हटले.