Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
बारामती : महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला होता. हा अपघात होता की घातपात होता याचा सखोल तपास व्हावी या मागणीसाठी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या, अनेक ठिकाणाहून माहिती गोळा करून ती माध्यमांसमोर मांडली. या विमान दुर्घटनेचा सखोल तपास व्हावा यासाठी त्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, सीआयडी ऑफीस, दिल्लीतही त्यांनी याबाबतचे मुद्दे मांडले आता येत्या २८ मे रोजी अजित पवारांच्या मृत्यूला चार (Ajit Pawar Death) महिने पूर्ण होतील, मात्र या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही, किंवा याबाबत काही ठोस माहिती पुढे आलेली नाही, त्याबाबत संताप व्यक्त करत रोहित पवारांनी (Rohit Pawar) आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) आव्हान देत अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी मित्रपक्षाला भाग पाडावं असं म्हटलं आहे, त्यांनी याबाबतची पोस्ट आपल्या सोशल मिडीयावरती शेअर केली आहे, त्यामध्ये त्यांनी भाजपवरती देखील हल्लाबोल केला आहे.