Maharashtra Politics: मुंबई निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये फूट? स्वबळावर लढण्यावरून मतभेद
Continues below advertisement
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये (Congress) मतभेद उघड झाले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबईत पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले असताना, दुसरीकडे नाशिकमध्ये काँग्रेस नेते राहुल दिवे (Rahul Dive) यांनी भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसेसोबत (MNS) जाण्याचे संकेत दिले आहेत. 'भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून लांब ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल असा जनतेतून आवाज आला होता,' असे राहुल दिवे यांनी म्हटले आहे. दिवे यांनी स्पष्ट केले की, स्थानिक पातळीवर मनसेला सोबत घेण्याबाबत चाचपणी सुरू असून, याबाबतचा अंतिम अहवाल बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना सादर केला जाईल. मात्र, मनसेसोबत काँग्रेसचे वैचारिक मतभेद असल्याचेही त्यांनी मान्य केले. दुसरीकडे, वडेट्टीवार यांनी मुंबईतील नेत्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे, ज्यामुळे आघाडीतील गोंधळ अधिकच वाढला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement