Ratnagiri: एसटीची अशत: वाहतूक सुरू, 200 हून अधिक कर्मचारी कामावर ABP Majha
रत्नागिरी जिल्ह्याच्या चार आगारातून ५४ बसेस सुटल्या आहेत. राजापूर, दापोली, खेड, देवरुख आणि चिपळूण स्थानकातून बसेस सुटल्या आहेत. तर, २०३ कर्मचारी कामावर परतल्याचं एसटी प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. असं असलं तरी मात्र, जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या रत्नागिरी आगारातून एकही एसटी सुटलेली नाही.