Ratnagiri Fire | जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरातील वणवा आटोक्यात, आंबा बागांचं नुकसान
रत्नागिरीतील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात वणवा पेटलाय, त्यामुळे आगीचे मोठे लोळ आकाशात जेपावतानाचे पाहायला मिळाले. काल दुपारी चार वाजताच्या सुमारास ही आग लागली होती, तर रात्री आठ वाजताच्या सुमारास आग आणखी भडकली होती. परंतु, त्यानंतर पावसाचं आगमन झाल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.