Ratnagiri : मत्स्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी ; पुढचे 3 महिने ताजे मासे बाजारात येणार नाही कारण...
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
01 Jun 2021 04:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमत्स्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी. पुढील अडीच ते तीन महिने तुम्हाला ताजे फडफफडीत मासे खाता येणार नाहीत. कारण नियमांनुसार आजपासून मासेमारी पुढील साधारण तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद असणार आहे. त्यामुळे सध्या सर्वच बोटी किनाऱ्यावर शेकारून ठेवल्याचं चित्र आहे. अगदी नारळी पौर्णिमेला दर्याराजाला नारळ अर्पण करून मासेमारी सुरू केली जाईल. त्यामुळे ताज्या, फडफडीत माशांकरता अर्थातच तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. हि मासेमारी बंद असण्यामागे पारंपरिक तसेच शास्त्रीय कारणं देखील आहेत.