Ratnagiri Barsu : वाडीखुर्द गावातील 308 एकर जमीनीच्या औद्योगिक क्षेत्राबाबतची अधिसूचना जाहीर

Continues below advertisement

Ratnagiri Barsu : वाडीखुर्द गावातील 308 एकर जमीनीच्या औद्योगिक क्षेत्राबाबतची अधिसूचना जाहीर  कोकणात रिफायनरी प्रस्तावित असलेल्या बारसु गावापासून 5 किमी अंतरावरील जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित   वाडीखुर्द गावातील 125 हेक्टर म्हणजे 308 एकर जमीनिच्या औद्योगिक क्षेत्राबाबतची अधिसूचना जाहीर   रिफायनरी प्रस्तावित असलेल्या बारसू गावापासून 5 किलोमीटर अंतरावरील क्षेत्राचा समावेश  सरकारच्या अधिसूचनेनंतर स्थानिक पातळीवर अनेक चर्चाना सुरुवात  
हेही वाचा : 

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) शांतता रॅलीला आज हिंगोलीतून (Hingoli) सकाळी साडेअकरा वाजता सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीतून हिंगोलीकडे रवाना होण्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.   शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीपासून सुरुवात होत आहे. मराठा ताकदीने एकत्र येणार आहे. आम्ही सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करणार आहे. शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील. त्यांनी याआधीही असे केले आहे. आमच्या पुढे आंदोलन करणे, सभा घेणे. आम्ही जे करत आहोत तेच करणे. मात्र, परिस्थिती बिघडल्यास त्याला जबाबदार छगन भुजबळ, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील, अशी टीका त्यांनी यावेळी छगन भुजबळांवर केली आहे. शांतता रॅली सुरू असली तरी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहेत. 123 जागा शोधल्या आहेत. पाचव्या टप्यात मुंबईत रॅली काढणार आहे. फडणवीस म्हणतात काँग्रेसने आरक्षण दिले नाही, त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्ही द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram