महाराष्ट्राचा विकास व्हावा हीच Narayan Rane यांची 'त्या' वक्तव्याबाबत भावना : Ramdas Athawale
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Aug 2021 01:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून Narayan Rane यांनी हे वक्तव्य केलं अस मत Ramdas Athawale यांनी व्यक्त केल आहे.